Published On Apr 5, 2024
पाली शहराच्या पूर्वेलाच जो पगडीच्या आकाराचा डोंगर दिसतो, यालाच सरसगड म्हटले जाते, कर्जत खोपोली पासून पाली शहरा परत जाता येते, तसेच नागा ठाणे हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे, मुंबईपासून 110 किलोमीटर तर पुण्यापासून शंभर किलोमीटर अंतरावर किल्ला आहे, या किल्ल्याचे बांधकाम यादवकालीन असून नंतर निजामशाहीच्या ताब्यात होता त्यानंतर शिवरायांनी हा किल्ला स्वराज्यात दाखल करून घेतला नारो मुकुंद यांना सबनिशी देण्यात आली. सरसगडच्या साठी 2000 होन शिवरायांनी नारो मुकुंद यांना दिले होते नंतर हा किल्ला भोर संस्थानाच्या ताब्यात देण्यात आला 1948 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर संस्था खालसा करण्यात आली त्यानंतर सरकारच्या ताब्यात हा किल्ला आला परंतु या किल्ल्याकडे नंतर दुर्लक्ष होत गेले
show more