Published On Jan 22, 2023
श्री समर्थ रामदासांनी श्रीमत दासबोध या अत्यंत प्रासादिक आणि आकलनास सुलभ अशा ग्रंथाची रचना केलेली आहे. या ग्रंथामध्ये मनुष्याच्या जीवनाला आवश्यक असणारे एकूण एक तत्त्वज्ञान सांगितलेले आहे. या ग्रंथात अंतर्भूत असणाऱ्या सर्व विषयांचा आढावा या पहिल्या दशकातील पहिल्या समासामध्ये घेण्यात आलेला आहे. मंगलाचरण म्हणजे त्या मंगलमय ईश्वराची सतत आस लागणे होय .या ग्रंथाच्या श्रवणामधून मनुष्याकडे असलेली देहबुद्धी बाजूला होऊन त्याला ईश्वराचे सान्निध्य लाभत असते.
जय जय रघुवीर समर्थ.
श्रीराम समर्थ .
श्री सद्गुरू कृपा.
show more