Published On Jun 23, 2024
#abhivachan #kathakathan #kathakathanmarathi #sachin #marathikathavachan #sasneh #सस्नेह
ग्रामीण भागातील परिस्थिती फारशी बदललेली नाही. थोडाफार शहरी स्पर्श झालेला असला तरी जमिनीवरची परिस्थिती आहे तशीच आहे. दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत चालला आहे. गरज असताना पावसाचा ठावठिकाणा नाही, आणि आलाच तर उभ्या पिकांचं नुकसान करून जातो. शेतमालाला भाव मिळत नाही. थोड्या मोठ्या शेतकऱ्यांचं एकवेळ ठिक, एक नाही तर दुसऱ्या पिकाला भाव मिळतो पण लहान शेतकऱ्यांचे हाल कुत्रं खात नाही. याच परिस्थितीत वाढून, शिकून सवरुन शहरात नोकरीला गेलेल्या मुलांना (सर्वच नाही) शहराचा पाणी लागतं व गावाकडे यायला त्यांना नकोसे वाटते. शेतीकडे ही विकली तर भरमसाठ पैसा मिळेल हाच विचार त्यांच्या डोक्यात. पण भविष्यात जमीनच रहाणार नाही हे त्यांच्या लक्षात येत नाही. जे गावात पाय रोवून आहेत ते मात्र हातची जमीन सोडायला तयार नाहीत. असा सर्व महिमा आहे. आजच्या ग्रामीण कथेत लेखिकेने याच विषयावर भावपूर्ण कथानक लिहिले आहे ते आज सादर करीत आहे.
अवकाळी
लेखिका- सौ. प्रांजली लाळे.
अभिवाचन- सचिन दातार